ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

निसर्गाचे रहस्य – १०

ज्यांना स्वतःचे शुद्धीकरण करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पाऊस असतो. तो तुमच्यातील सारे दोष, साऱ्या त्रुटी आणि साऱ्या अशुद्धता दूर करतो. पावसामध्ये पृथ्वीचे, पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या माणसांचे आणि पृथ्वीवरील वातावरणाचे शुद्धीकरण करण्याची शक्ती असते.

परंतु त्यासाठी व्यक्तीने स्वतःला खुले ठेवले पाहिजे, तिच्या मनात किंचितही भीती असता उपयोगी नाही; ताप येईल किंवा आपण आजारी पडू अशी कोणतीही भीती असता कामा नये. आपल्या वर असणाऱ्या त्या ‘विशालते’प्रत आपण स्वतःला खुले ठेवले आणि पावसाला आपले शुद्धीकरण करू दिले, तर त्याचे ठोस परिणाम दिसून येतात.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 197)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

14 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago