विचार शलाका – १७
एकेकाळी ज्याबद्दल आशा बाळगण्यात आली होती की, शिक्षण आणि बौद्धिक प्रशिक्षण यामुळे माणूस बदलू शकेल; पण तसे प्रत्यक्ष अनुभवांती आढळून आले नाही. त्यामुळे झाले काय तर, मानवाच्या वैयक्तिक आणि सामूहिक अहंभावाला, त्याच्या स्व-दृढीकरणासाठी (self-affirmation) अधिक चांगली माहिती प्राप्त झाली आणि अधिक कार्यक्षम अशी यंत्रणा उपलब्ध झाली इतकेच, पण मानवाचा पूर्वीचा अपरिवर्तित अहंकार मात्र तसाच शिल्लक राहिला.
*
मानवी प्रकृतीत बदल न होऊन देखील मानवी जीवनांत खरा बदल होऊ शकेल अशी आशा करणे हे तर्कहीन आहे तसेच ते अध्यात्मालाही न पटणारे विधान आहे. ते अनैसर्गिक आणि अवास्तव, अशक्य कोटीच्या चमत्काराची अपेक्षा करण्यासारखे आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 1094, 1096)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…