विचार शलाका – ०६
सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो.
एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या म्हणजे, ‘ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग अडवून उभे ठाकणारे प्रचंड अडथळे असतात. तुम्ही जर तुमची स्वत:ची इच्छा ‘ईश्वरा’वर लादू पहात असाल तर, ते म्हणजे एखादा बॉम्ब तुमच्यावर येऊन आदळावा म्हणून त्या बॉम्बलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. गोष्टी अशा रीतीनेच घडतील, असे मी म्हणत नाही. पण लोक जर जागरूक व अतिशय सतर्क झाले नाहीत आणि सच्च्या साधकभावाने वागले नाहीत, तर गोष्टी अशा रीतीनेच घडण्याची दाट शक्यता असते.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 121)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…