सद्भावना – १०
मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे घडते ते तुम्हालाच शिकवण देण्यासाठी असते की, व्यक्तीने कोणतातरी अंतःस्थ हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.
नेहमीसाठी तोच धडा आहे : जितके काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर होईल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते.
चांगुलपणाच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजेत, न्यायाच्या प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असायला हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…