साधनेची मुळाक्षरे – २४
(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे – ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ईश्वरी ‘शक्ती’ व तिची ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी आत्मरूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा वापर केला जात आहे – हे आपल्याला जाणवले पाहिजे. ‘ईश्वरी उपस्थिती’ जेव्हा सातत्याने आपल्यामध्ये असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो. एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक साक्षात्कारामध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो. ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात येणारा मुक्त व जीवलग बहर तसेच ‘ईश्वराशी संपर्क’ व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा क्षुल्लक गोष्टी जवळ करण्यापेक्षा, जी ईश्वराचा साक्षात्कार प्रदान करू शकते ती ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक उत्तम. आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचे ईश्वरीकरण (divinization) करणे हा देखील, आम्ही जो दिव्य आराखडा पाहत आहोत त्याचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वाला जाऊ शकतो; ही अशी एक गोष्ट आहे की जी एखाद्या मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर अंतरंगातून बाह्य दिशेनेच ती विकसित होत जाते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05-06)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…