ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानसिक आणि आंतरिक साक्षात्कार

साधनेची मुळाक्षरे – २४

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे – ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ईश्वरी ‘शक्ती’ व तिची ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी आत्मरूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा वापर केला जात आहे – हे आपल्याला जाणवले पाहिजे. ‘ईश्वरी उपस्थिती’ जेव्हा सातत्याने आपल्यामध्ये असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो. एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक साक्षात्कारामध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो. ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात येणारा मुक्त व जीवलग बहर तसेच ‘ईश्वराशी संपर्क’ व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा क्षुल्लक गोष्टी जवळ करण्यापेक्षा, जी ईश्वराचा साक्षात्कार प्रदान करू शकते ती ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक उत्तम. आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचे ईश्वरीकरण (divinization) करणे हा देखील, आम्ही जो दिव्य आराखडा पाहत आहोत त्याचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वाला जाऊ शकतो; ही अशी एक गोष्ट आहे की जी एखाद्या मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर अंतरंगातून बाह्य दिशेनेच ती विकसित होत जाते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05-06)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago