साधनेची मुळाक्षरे – १४
संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास सक्षम होणे असा त्याचा अर्थ आहे.
*
‘श्रीमाताजीं’प्रत उन्मुख असणे म्हणजे सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे, त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये करू देणे, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करू देणे, तुम्हाला ज्ञान, शांती आणि ‘आनंद’ प्रदान करू देणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले राखू शकत नसाल तर, उन्मुख होण्यासाठी तुम्ही सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.
*
उन्मुखतेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समर्पण; पण जोपर्यंत समर्पण झालेले नाही तोवर, अभीप्सा आणि स्थिरता यांद्वारे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उन्मुखता येऊ शकते.
*
तुमच्या चेतनेची जेव्हा तयारी होईल तेव्हा ‘श्रीमाताजीं’प्रति असलेल्या विश्वासामुळे, आवश्यक असणारे खुलेपण येईल. ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचे नियोजन करण्यास काहीच हरकत नाही, पण जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्यासाठी केवळ ध्यान पुरेसे नाही. तर तेथे ‘श्रीमाताजीं’प्रति असणारी उन्मुखता आणि श्रद्धा आवश्यक आहे; त्यामुळेच ती गोष्ट प्राप्त होईल.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 105), (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 106), (CWSA 29 : 109)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…