साधनेची मुळाक्षरे – ०६
प्रश्न : पण ईश्वराला या गोंधळामध्ये, या पृथ्वीवर आविष्कृत व्हायची इच्छा का असते?
श्रीमाताजी : पृथ्वी म्हणजे त्या ईश्वराचेच विरूप (deformation) आहे आणि ‘तो’ त्याचे सत्य पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रस्थापित करू इच्छितो. त्याचसाठी त्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे ; त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. पृथ्वी ही ‘त्याच्या’पासून विलग झालेली गोष्ट नाही किंवा ‘त्याला’ परकी नाही. पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण आहे; ही पृथ्वी तिच्या साररूपात जशी होती तशीच, म्हणजे ‘ईश्वरस्वरूप’ बनण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे.
प्रश्न : पण मग तो ‘ईश्वर’ आपल्यासाठी इतका अनोळखी का आहे?
श्रीमाताजी : बाळा, तो काही अनोळखी नाही. तो अनोळखी आहे, अशी तुम्ही कल्पना करता पण तो तसा नाही, तो अजिबात तसा नाही. तो तुमच्या अस्तित्वाचे सार आहे – तो काही अनोळखी नाही. तुम्ही ‘त्याला’ ओळखत नसलात तरीही तो अनोळखी नाही; तो तुमच्या अस्तित्वाचे अगदी मूळ सार-सर्वस्व आहे. ‘ईश्वरा’खेरीज तुम्ही अस्तित्वातच राहू शकणार नाही. ईश्वराखेरीज सेकंदाच्या एक दशलक्षाव्या भागाइतका काळदेखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. याचे कारणच असे आहे की तुम्ही एक प्रकारच्या भ्रमामध्ये व विरूपामध्ये जगत असता, तुम्हाला त्याची जाणीव नसते. तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाविषयी सजग नसता, तर तुम्ही जे आहात, असे तुम्हाला वाटत असते, त्याच्याविषयीच फक्त तुम्हाला जाणीव असते; पण वस्तुतः तुम्ही ते नसता.
प्रश्न : माताजी, मग मी स्वतः कोण आहे?
श्रीमाताजी : ईश्वर!
– श्रीमाताजी
(CWM 07 : 191-192)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…