सामान्य माणूस मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच भयभीत झालेला असतो. शास्त्रज्ञ मंडळी मृत्युवर मात करण्यासाठी संशोधन करत असतात. संत मंडळी आपल्याला ‘मरणाचे स्मरण असावे’ असे सांगतात. गूढवाद्यांना मृत्यू व त्यानंतरचे जीवन खुणावत राहते. तर अध्यात्ममार्गावर ज्यांची वाटचाल चालू झालेली असते त्यांच्यापैकी काहीजणांची जन्म-मृत्युच्या कोड्याची उकल व्हावी म्हणून धडपड सुरू असते. काहीही असले तरी, सर्वांनाच आपले जीवन अखंडित राहावे, मृत्युमुळे ते संपुष्टात येऊ नये, अशी आस असते. अमृत, अमरता, अमर्त्यत्व या गोष्टींची ओढ साऱ्यांनाच असते. जीवनाच्या अविनाशत्वाविषयी ही संवेदना निसर्गाने उपजतच मनुष्यामध्ये पेरलेली आहे. पण त्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला नेमकेपणाने आजवर उलगडलेला नाही. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी अमर्त्यता म्हणजे काय ते सांगून, अमर्त्यत्व कसे प्राप्त करून घेता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.
– संपादक, अभीप्सा मासिक
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…