सामान्य माणूस मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच भयभीत झालेला असतो. शास्त्रज्ञ मंडळी मृत्युवर मात करण्यासाठी संशोधन करत असतात. संत मंडळी आपल्याला ‘मरणाचे स्मरण असावे’ असे सांगतात. गूढवाद्यांना मृत्यू व त्यानंतरचे जीवन खुणावत राहते. तर अध्यात्ममार्गावर ज्यांची वाटचाल चालू झालेली असते त्यांच्यापैकी काहीजणांची जन्म-मृत्युच्या कोड्याची उकल व्हावी म्हणून धडपड सुरू असते. काहीही असले तरी, सर्वांनाच आपले जीवन अखंडित राहावे, मृत्युमुळे ते संपुष्टात येऊ नये, अशी आस असते. अमृत, अमरता, अमर्त्यत्व या गोष्टींची ओढ साऱ्यांनाच असते. जीवनाच्या अविनाशत्वाविषयी ही संवेदना निसर्गाने उपजतच मनुष्यामध्ये पेरलेली आहे. पण त्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला नेमकेपणाने आजवर उलगडलेला नाही. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी अमर्त्यता म्हणजे काय ते सांगून, अमर्त्यत्व कसे प्राप्त करून घेता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.
– संपादक, अभीप्सा मासिक
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…