समर्पण – ४६
व्यक्तिगत प्रयत्न हे उत्तरोत्तर ‘दिव्य शक्ती’च्या क्रियेमध्ये रूपांतरित केले पाहिजेत. जर तुम्हाला दिव्य शक्तीची जाणीव होत असेल तर, तुमच्या प्रयत्नांना त्या दिव्य शक्तीने अधिकाधिक संचालित करावे, तिने ते प्रयत्न हाती घ्यावेत आणि (तिने ते प्रयत्न हाती घेतल्यानंतर,) ते प्रयत्न तुमचे न राहता, ते श्रीमाताजींचे व्हावेत यासाठी, त्या दिव्य शक्तीने त्या प्रयत्नांचे रूपांतर करावे म्हणून तिला आवाहन करा. तेव्हा तिथे एक प्रकारचे रूपांतरण घडेल, तुमच्या व्यक्तिगत आधारामध्ये (मन, प्राण, शरीर यांमध्ये) कार्यरत असणाऱ्या शक्ती हाती घेतल्या जातील; हे रूपांतरण एकाएकी पूर्णत्वाला जाणार नाही तर ते उत्तरोत्तर होत राहील. पण यासाठी आंतरात्मिक संतुलनाची आवश्यकता असते : दिव्य शक्ती म्हणजे काय, व्यक्तिगत प्रयत्नांचे घटक कोणते आणि कनिष्ठ वैश्विक शक्तींकडून त्यात कशी सरमिसळ होत गेली आहे, या गोष्टी अगदी अचूकपणाने पाहणारा विवेक विकसित झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हे रूपांतरण पूर्णत्वाला पोहोचत नाही, – ज्याला नेहमीच दीर्घकाळ लागतो, – तोपर्यंत त्यासाठी नेहमीच व्यक्तिगत योगदान असणे आवश्यक असते; खऱ्या शक्तीला सातत्यपूर्ण अनुमती, आणि कोणत्याही कनिष्ठ सरमिसळीला सातत्यपूर्ण नकार या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 84-85)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…