समर्पण – ४२
…आयुष्यात निदान एकदा तरी, आपल्याबाबतीत अशी परिस्थिती येते की जेव्हा ईश्वरी इच्छेप्रत संपूर्ण समर्पण करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, याची परीक्षा होते; आपण ईश्वरत्वाच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या आविष्करणासाठी धडपणारे मानव आहोत का याची परीक्षा होते; परमोच्च विजयासाठी जगातील यच्चयावत सर्व गोष्टींचा म्हणजे ज्या आपल्याला खराब वाटतात किंवा ज्या आपल्याला चांगल्या वाटतात अशाही सर्व गोष्टींचा, परित्याग करण्याची तुमची तयारी आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी आयुष्यात अशी परिस्थिती येत असते. आपल्या बाह्य दुर्बलता आणि दोष यांच्यापेक्षा आपले गुण आणि आपली कर्तव्यं – म्हणजे असे म्हणता येईल की, आपले मानसिक पूर्वग्रह आणि अग्रक्रम, हे शिखरावर जाण्याच्या या आरोहणामध्ये, मार्गावर वाट अडवून उभे राहतात. एखादी त्रुटी ही नेहमीच उड्डाणफळी म्हणून वापरता येते पण गुण मात्र बरेचदा एक मर्यादा बनून, एक अडथळा बनून समोर उभे ठाकतात, त्यांना ओलांडूनच पुढे जावे लागते.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…