समर्पण – ४२
…आयुष्यात निदान एकदा तरी, आपल्याबाबतीत अशी परिस्थिती येते की जेव्हा ईश्वरी इच्छेप्रत संपूर्ण समर्पण करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, याची परीक्षा होते; आपण ईश्वरत्वाच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या आविष्करणासाठी धडपणारे मानव आहोत का याची परीक्षा होते; परमोच्च विजयासाठी जगातील यच्चयावत सर्व गोष्टींचा म्हणजे ज्या आपल्याला खराब वाटतात किंवा ज्या आपल्याला चांगल्या वाटतात अशाही सर्व गोष्टींचा, परित्याग करण्याची तुमची तयारी आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी आयुष्यात अशी परिस्थिती येत असते. आपल्या बाह्य दुर्बलता आणि दोष यांच्यापेक्षा आपले गुण आणि आपली कर्तव्यं – म्हणजे असे म्हणता येईल की, आपले मानसिक पूर्वग्रह आणि अग्रक्रम, हे शिखरावर जाण्याच्या या आरोहणामध्ये, मार्गावर वाट अडवून उभे राहतात. एखादी त्रुटी ही नेहमीच उड्डाणफळी म्हणून वापरता येते पण गुण मात्र बरेचदा एक मर्यादा बनून, एक अडथळा बनून समोर उभे ठाकतात, त्यांना ओलांडूनच पुढे जावे लागते.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…