हे ईश्वरा, मला तुझा प्रकाश प्रदान कर. हे प्रभो, माझ्या हातून कधीही चूक घडू नये असे मला वरदान दे. माझ्यामध्ये तुझ्याविषयी जो परम आदर आहे, तुझ्याविषयीची जी परमभक्ती आहे, तुझ्याविषयी माझ्या मनात जे उत्कट आणि गभीर प्रेम आहे ते प्रेम, ती भक्ती, तो आदर दीप्तीमान होत, विश्वास उत्पन्न करणारा होत, सहवासामुळे इतरांमध्येही प्रसृत होत, सर्वांच्या हृदयामध्ये उदित होऊ दे.
हे प्रभो, शाश्वत स्वामी, तूच आहेस माझा प्रकाश आणि माझी शांती ! माझा मार्गदर्शक हो, तूच माझे डोळे उघड, माझे हृदय उजळवून टाक आणि जो थेट तुझ्याकडेच घेऊन जाईल असा मार्ग मला दाखव.
हे ईश्वरा, तुझ्या इच्छेव्यतिरिक्त माझी कोणतीही अन्य इच्छा असता कामा नये आणि माझ्या कृती या तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती असतील, असे वरदान दे.
तुझ्या दिव्य प्रकाशाचा ओघ माझे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकत आहे आणि मला आता तुझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचेही भान नाही, केवळ तुझीच…..
शांती, शांती, शांती, या पृथ्वीवर शांती.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 39)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…