आपण सुव्यवस्था, सुमेळ, सौंदर्य… आणि सामुदायिक अभीप्सा यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे – तूर्तास तरी ह्या गोष्टी इथे नाहीत. इतरांकडून जशा वागण्याची आपण अपेक्षा बाळगतो त्याचे उदाहरण आपण स्वत: घालून देणे, हे आपले संयोजक या नात्याने कर्तव्य आहे. आपण वैयक्तिक प्रतिक्रियांच्या वर उठले पाहिजे. दिव्य संकल्पाशी अनन्यभावे आपला सूर जुळवून घेत, आपण त्या दिव्य इच्छेचे सालस उपकरण बनून राहिले पाहिजे. आपण निर्व्यक्तिक असले पाहिजे; कोणत्याही व्यक्तिगत प्रतिक्रियेविना असले पाहिजे.
आपण सर्वांगाने प्रांजळ असले पाहिजे. भगवंत जे इच्छितो, तसेच होवो. जर आपण तसे होऊ शकलो तर, आपण जसे असायला हवे तसे असू, आणि आपल्याला तेच तर बनायचे आहे. उर्वरित सर्व गोष्टी, सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करूया.
हे सोपे नाही हेही मी जाणते, पण आपण इथे सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नाही; साधे सोपे जीवन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी सारे जग आहे. ऑरोविलमध्ये येणे ह्याचा अर्थ सहजसोप्या, आरामशीर जीवनाकडे वळणे नव्हे, ह्याची जाणीव लोकांना व्हावी, हे मला अभिप्रेत आहे. ‘ऑरोविलमध्ये येणे’ ह्याचा अर्थ प्रगतीसाठी भगीरथप्रयत्नांना सिद्ध होणे हा होय. आणि ह्याच्याशी जुळवून घेण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनी सोडून जावे.
लोकांना हे माहीत असावे की, ऑरोविलमध्ये येणे म्हणजे प्रगती करण्यासाठी जणु अतिमानवीय प्रयत्न करणे होय.
आपल्या वृत्तीच्या आणि प्रयत्नाच्या मन:पूर्वकतेमुळे, प्रामाणिकतेमुळे खरा फरक पडतो. लोकांना ही जाणीव असावी की, अप्रामाणिकता व मिथ्यत्वाला इथे थारा नाही – ह्यांचे येथे काही चालत नाही….
आपण इथे अतिमानवतेची तयारी करण्यासाठी आहोत, खुशालचेंडू जीवन जगण्यासाठी किंवा पुन्हा आपल्या वासनाविकारांच्या गर्ततेत जाण्यासाठी नव्हे, नक्कीच नाही.
– श्रीमाताजी
(Conversations with a disciple, April 4, 1972)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…