…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे.
मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी, नव्हे, चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती.) म्हणून मी त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, “सर्वसाधारण असा संघर्ष टाळण्याची ही मानवजातीसाठी असलेली सर्वोत्तम संधी आहे.” म्हणून, जेव्हा त्यांनी असे सांगितले तेव्हापासून मी त्यावर मन:पूर्वकतेने काम करीत आले आहे. अर्थात, ते नुसते ‘सांगणे’ नव्हते तर ती ‘अनुभूती’ होती.
…त्याचा पाया…”विविधतेतून एकतेची उभारणी करण्याची कला” हा आहे. एकसारखेपणा नव्हे. तर व्यामिश्रतेमधील सुमेळ यामधून आलेली एकता, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी असणे…..
श्रीअरविंदांना म्हणावयाचे होते, साधारणपणे सर्व घडामोडी अरिष्टाच्या दिशेने जात होत्या आणि म्हणून ऑरोविलची निर्मिती म्हणजे शक्तिप्रवाह योग्य दिशेने वळविण्याची कृती होती.
(The Mother : Conversations with a disciple, Oct 25, 1967)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…