…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे.
मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी, नव्हे, चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती.) म्हणून मी त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, “सर्वसाधारण असा संघर्ष टाळण्याची ही मानवजातीसाठी असलेली सर्वोत्तम संधी आहे.” म्हणून, जेव्हा त्यांनी असे सांगितले तेव्हापासून मी त्यावर मन:पूर्वकतेने काम करीत आले आहे. अर्थात, ते नुसते ‘सांगणे’ नव्हते तर ती ‘अनुभूती’ होती.
…त्याचा पाया…”विविधतेतून एकतेची उभारणी करण्याची कला” हा आहे. एकसारखेपणा नव्हे. तर व्यामिश्रतेमधील सुमेळ यामधून आलेली एकता, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी असणे…..
श्रीअरविंदांना म्हणावयाचे होते, साधारणपणे सर्व घडामोडी अरिष्टाच्या दिशेने जात होत्या आणि म्हणून ऑरोविलची निर्मिती म्हणजे शक्तिप्रवाह योग्य दिशेने वळविण्याची कृती होती.
(The Mother : Conversations with a disciple, Oct 25, 1967)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…