…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे.
मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी, नव्हे, चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती.) म्हणून मी त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, “सर्वसाधारण असा संघर्ष टाळण्याची ही मानवजातीसाठी असलेली सर्वोत्तम संधी आहे.” म्हणून, जेव्हा त्यांनी असे सांगितले तेव्हापासून मी त्यावर मन:पूर्वकतेने काम करीत आले आहे. अर्थात, ते नुसते ‘सांगणे’ नव्हते तर ती ‘अनुभूती’ होती.
…त्याचा पाया…”विविधतेतून एकतेची उभारणी करण्याची कला” हा आहे. एकसारखेपणा नव्हे. तर व्यामिश्रतेमधील सुमेळ यामधून आलेली एकता, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी असणे…..
श्रीअरविंदांना म्हणावयाचे होते, साधारणपणे सर्व घडामोडी अरिष्टाच्या दिशेने जात होत्या आणि म्हणून ऑरोविलची निर्मिती म्हणजे शक्तिप्रवाह योग्य दिशेने वळविण्याची कृती होती.
(The Mother : Conversations with a disciple, Oct 25, 1967)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…