व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी म्हणजे मग त्याने तंदुरुस्त होण्यासाठी, काय करायला हवे ते तुम्ही त्याला ताबडतोब सांगू शकाल. म्हणजे लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे, त्यांना समजावून सांगायचे. म्हणजे ते जेव्हा अहितकारक गोष्टींमध्ये गुंतू लागतात (हाच तो क्षण असतो जेव्हा त्यांना सांगितले गेले पाहिजे) तेव्हा तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे की, नाही, या पद्धतीने काम करता कामा नये, तर ते अमुक अशा पद्धतीने केले पाहिजे.
उदाहरणार्थ असे समजा की, तुमचे हृदय वेड्यासारखे धडधडायला लागले तर, तेव्हा तुम्ही त्याला शांत केले पाहिजे. त्याला सांगितले पाहिजे की, असे वागता कामा नये आणि त्याच वेळी (केवळ त्याच्या मदतीसाठी म्हणून) तुम्ही दीर्घ, तालबद्ध, नियमित असा श्वासोच्छ्वास करू लागाल, तर अशा वेळी तुमची फुफ्फुसे ही हृदयाची मार्गदर्शक होतील आणि योग्य रीतीने काम कसे करायचे असते, हे ती हृदयाला शिकवतील. अशी मी हजारो उदाहरणे तुम्हाला देऊ शकते. तर… जीवाच्या विविध भागांमध्ये असंतुलन असते, त्यांच्या कार्यामध्ये विसंवाद असतो, हे मी तुम्हाला आत्ता सांगितले.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…