व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी म्हणजे मग त्याने तंदुरुस्त होण्यासाठी, काय करायला हवे ते तुम्ही त्याला ताबडतोब सांगू शकाल. म्हणजे लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे, त्यांना समजावून सांगायचे. म्हणजे ते जेव्हा अहितकारक गोष्टींमध्ये गुंतू लागतात (हाच तो क्षण असतो जेव्हा त्यांना सांगितले गेले पाहिजे) तेव्हा तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे की, नाही, या पद्धतीने काम करता कामा नये, तर ते अमुक अशा पद्धतीने केले पाहिजे.
उदाहरणार्थ असे समजा की, तुमचे हृदय वेड्यासारखे धडधडायला लागले तर, तेव्हा तुम्ही त्याला शांत केले पाहिजे. त्याला सांगितले पाहिजे की, असे वागता कामा नये आणि त्याच वेळी (केवळ त्याच्या मदतीसाठी म्हणून) तुम्ही दीर्घ, तालबद्ध, नियमित असा श्वासोच्छ्वास करू लागाल, तर अशा वेळी तुमची फुफ्फुसे ही हृदयाची मार्गदर्शक होतील आणि योग्य रीतीने काम कसे करायचे असते, हे ती हृदयाला शिकवतील. अशी मी हजारो उदाहरणे तुम्हाला देऊ शकते. तर… जीवाच्या विविध भागांमध्ये असंतुलन असते, त्यांच्या कार्यामध्ये विसंवाद असतो, हे मी तुम्हाला आत्ता सांगितले.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…