जे स्वत:च्या सामान्य प्रकृतीवर मात करण्यासाठी धडपडतात; दिव्य सत्याच्या संपर्कात येण्याचा जो खोलवरचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तो जडभौतिकामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी, जे प्रयत्नशील असतात; जे अतीत किंवा सर्वोच्चाप्रत निघून जाण्याऐवजी, स्वत:च्या अंतरंगात अनुभवास आलेले जाणिवेतील परिवर्तन भौतिकरित्या, बाह्यात उतरविण्यासाठीसुद्धा धडपडतात; ते सर्व अतिमानवतेचे उमेदवार असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या यशस्वितेमध्ये अनेकानेक प्रकार आहेत.
ज्या ज्या वेळी आपण सामान्य माणूस म्हणून बनून राहण्याचे नाकारतो, सामान्य जीवन जगणे नाकारण्याचा प्रयत्न करतो; ज्या ज्या वेळी आपल्या हालचालींमधून, कृतींमधून, प्रतिक्रियांमधून आपण ते दिव्य सत्यच अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; जेव्हा सार्वत्रिक अज्ञानाची सत्ता आपल्यावर चालू न देता, दिव्य सत्याने आपण शासित होतो, त्या वेळी आपण अतिमानवतेचे प्रशिक्षणार्थी असतो. आणि आपल्या प्रयत्नांच्या यशस्वितेनुसार, आपण कमी अधिक प्रमाणात सक्षम प्रशिक्षणार्थी असतो, कमी अधिक प्रमाणात या मार्गावर प्रगत झालेले असतो.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 410)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…