भारताचे पुनरुत्थान – ०८

भारताचे पुनरुत्थान – ०८

(श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग)

राष्ट्राचा आत्मसन्मान हाच आपला धर्म आणि आत्मयज्ञ हीच आपली एकमेव कृती किंवा हेच आपले एकमेव कर्तव्य! आपल्यामधील दैवी गुण प्रकट व्हावेत यासाठी आपण पुरेसा वाव दिला पाहिजे. क्षुल्लक भावनांचा त्याग केला पाहिजे. मरणाचा प्रसंग आला तरी घाबरता कामा नये.

मागे हटू नका; राष्ट्रासाठी यातना सहन करा. ईश्वर हाच तुमचा आधार आहे. तुम्ही जर असे केलेत तर भारताला त्वरित त्याचे गतवैभव आणि कीर्ती पुन्हा प्राप्त होईल. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहील. तो इतर राष्ट्रांना शिक्षित करेल; त्याच्यामधून खऱ्या ज्ञानाचे तेज ओसंडून वाहील आणि भारत वेदान्ताची तत्त्वे रुजवेल. आपले राष्ट्र हे मानववंशाच्या आणि संपूर्ण जगाच्या हितासाठी पुढे सरसावेल. संपूर्ण जग हे त्याच्याद्वारे संचालित केले जाईल. पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचे ऋण फेडण्यास तयार होऊ तेव्हाच हे घडून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 860)

श्रीअरविंद