Entries by श्रीअरविंद

श्रीमाताजी आणि समीपता – १९

श्रीमाताजी आणि समीपता – १९ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) साधक : श्रीमाताजींच्या नुसत्या दर्शनानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची जाणीव आहे? श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव (psychic feeling) आहे. साधक : श्रीमाताजींच्या स्मरणानेच समाधान आणि आनंद लाभतो, ही कोणत्या प्रकारची भावना आहे? श्रीअरविंद : ही आंतरात्मिक जाणीव आहे. साधक : श्रीमाताजींच्या विरोधात कोणी काही […]

श्रीमाताजी आणि समीपता – १७

श्रीमाताजी आणि समीपता – १७ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) श्रीमाताजींचे प्रेम सदोदित असतेच आणि त्यांच्या प्रेमापुढे मानवी प्रकृतीच्या अपूर्णतांचा पाडावच लागू शकत नाही. एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला ते प्रेम सदोदित मिळत असल्याची जाणीव असणे आवश्यक असते. तुमचा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते कारण त्या चैत्य पुरुषाला त्याची […]

श्रीमाताजी आणि समीपता – १६

श्रीमाताजी आणि समीपता – १६ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच […]

श्रीमाताजी आणि समीपता – १५

श्रीमाताजी आणि समीपता – १५ माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या […]

श्रीमाताजी आणि समीपता – १४

श्रीमाताजी आणि समीपता – १४ तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून आणि त्यामधून ज्या मानसिक कल्पना तुम्ही करत राहता, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली पाहिजे. त्यापेक्षा अन्य कोणतीच गोष्ट मार्गामध्ये इतका अडथळा निर्माण करणारी असत नाही. * कोणालाही दुसऱ्याविषयी किंवा दुसऱ्या गोष्टीबाबत मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण सर्वांना श्रीमाताजी […]

श्रीमाताजी आणि समीपता – १३

श्रीमाताजी आणि समीपता – १३ साधक : एखादी व्यक्ती जर स्वतःच्या अंत:करणामध्ये डोकावून पाहील तर तिथे व्यक्तीला निश्चितपणे श्रीमाताजींचे स्मितहास्य आढळून येईल. असे असताना मग हृदयातून बाहेरच का पडायचे आणि त्यांचे स्मितहास्य बाहेर शोधत का हिंडायचे? श्रीअरविंद : अंतरंगामध्ये राहणे आणि अंतरंगामध्ये राहून, भौतिक जीवनाला नवीन आकार देणे हे आध्यात्मिक जीवनाचे पहिले तत्त्व आहे. परंतु […]

श्रीमाताजी आणि समीपता – १२

श्रीमाताजी आणि समीपता – १२ साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे. श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, […]

श्रीमाताजी आणि समीपता – १०

श्रीमाताजी आणि समीपता – १० व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

श्रीमाताजी आणि समीपता – ०९ पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती, विशेषतः प्राणाची (vital) शांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते; तर ती उच्चतर चेतनेशी, म्हणजे ईश्वरी चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर, म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते. ज्या व्यक्ती आपले मन आणि प्राण श्रीमाताजींच्या सामर्थ्याप्रत आणि […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

श्रीमाताजी आणि समीपता – ०८ साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल? श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. […]