ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला शांती, विशुद्धतेची आणि स्थिरचित्ततेची जी जाणीव होत आहे ती जाणीव, कनिष्ठ चेतनेचा उच्चतर चेतनेशी घनिष्ठ संपर्क आल्यामुळे किंवा तिच्याशी एकत्व पावल्यामुळे निर्माण झाली आहे. सुरुवातीला ती जाणीव चिरस्थायी असू शकत नाही परंतु पुढील दोन गोष्टींमुळे ती चिरस्थायी होऊ शकते.

• स्थिरचित्तता व शांती यांची वारंवारिता (frequency) आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता (durability) वाढत गेली तर त्याद्वारे ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.
• उच्चतर चेतनेच्या चिरंतन शांतीचे तसेच स्थिरचित्तत्ता व निश्चल-नीरवता यांचे कनिष्ठ प्रकृतीमध्ये पूर्ण अवतरण झाले तर त्याद्वारेदेखील, ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 66)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

आध्यात्मिक शक्तीची अनुभूती

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) सघन आध्यात्मिक शक्ती म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?…

1 day ago

योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ

  (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अदृश्य शक्ती इंद्रियसंवेद्य (tangible) असे आंतरिक आणि बाह्य परिणाम घडवून आणतात,…

2 days ago

योगशक्तीची विविध रूपे

  ‘योगशक्ती’ आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली…

3 days ago

ईश्वराचे साधन होण्यासाठी…

  (ईश्वराचे माध्यम झाल्याचा अनुभव कसा असतो, ते श्रीमाताजींनी विशद केले. त्यानंतर साधक आणि त्यांच्यामध्ये…

4 days ago

उच्चतर चेतनेची शक्ती

(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत…

5 days ago

मस्तकामध्ये एकाग्रता करणे

  एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता…

6 days ago