(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)
मस्तकाच्या वर स्थित असणारी शक्ती ही अर्थातच श्रीमाताजींची शक्ती आहे. ती उच्चतर चेतनेची शक्ती आहे आणि ती तिच्या अवतरणासाठीचा मार्ग तयार करत आहे. ही उच्चतर चेतना तिच्यासोबत व्यापकता, अमर्याद अस्तित्व, प्रकाश, शक्ती, शांती, आनंद इत्यादी गोष्टींची जाणीव घेऊन येत असते. ती नेहमीच मस्तकाच्या वरच्या बाजूस असते. जेव्हा आध्यात्मिक शक्तींपैकी कोणती तरी एखादी गोष्ट साधकाच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी खाली अवतरत असते तेव्हा ती शक्ती तेथूनच येत असते. परंतु जोपर्यंत साधकाची तयारी झालेली नसते तोपर्यत शांती, आनंद इत्यादींसारख्या कोणत्याच गोष्टीचे संपूर्ण अवतरण होत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 458)
एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता…
आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले…
निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर…
साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का? श्रीअरविंद…
व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र…