स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुम्हाला शांती, विशुद्धतेची आणि स्थिरचित्ततेची जी जाणीव होत आहे ती जाणीव, कनिष्ठ चेतनेचा उच्चतर चेतनेशी घनिष्ठ संपर्क आल्यामुळे किंवा तिच्याशी एकत्व पावल्यामुळे निर्माण झाली आहे. सुरुवातीला ती जाणीव चिरस्थायी असू शकत नाही परंतु पुढील दोन गोष्टींमुळे ती चिरस्थायी होऊ शकते.
• स्थिरचित्तता व शांती यांची वारंवारिता (frequency) आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता (durability) वाढत गेली तर त्याद्वारे ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.
• उच्चतर चेतनेच्या चिरंतन शांतीचे तसेच स्थिरचित्तत्ता व निश्चल-नीरवता यांचे कनिष्ठ प्रकृतीमध्ये पूर्ण अवतरण झाले तर त्याद्वारेदेखील, ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.
– श्रीअरविंद (CWSA 28 : 66)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव - September 1, 2026
- आध्यात्मिक शक्तीची अनुभूती - August 31, 2026
- योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ - August 30, 2026





