(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
अदृश्य शक्ती इंद्रियसंवेद्य (tangible) असे आंतरिक आणि बाह्य परिणाम घडवून आणतात, हा योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ आहे. तुम्ही म्हणत आहात की, योगामुळे तुम्हाला त्या शक्तीची नुसती जाणीव होते पण त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही. पण असे म्हणणे हेच खरंतर चमत्कारिक आहे. अशा प्रकारच्या निरर्थक भ्रमाबाबत कोण बरे समाधानी राहू शकेल आणि असे असेल तर मग तिला ‘शक्ती’ असे तरी कसे म्हणता येईल?
आंतरिक शक्ती मनामध्ये पालट घडवून आणू शकते, मनाच्या शक्तींचा विकास करू शकते किंवा नवीन क्षमतांची त्यामध्ये भर घालू शकते; ती शक्ती ज्ञानाच्या नवीन श्रेणी उदयास आणू शकते; प्राणिक गतिप्रवृत्तींवर स्वामित्व संपादन करू शकते; व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवून आणू शकते; माणसांवर व वस्तुमात्रांवर प्रभाव पाडू शकते; शरीराच्या कार्यप्रणालीवर आणि परिस्थितीवर नियंत्रण आणू शकते; इतर शक्तींवर गतिमान शक्ती या नात्याने सघन कार्य करू शकते; घटनांमध्ये सुधारणा करू शकते अशा प्रकारच्या गोष्टी ती करत असते. असे जर हजारो अनुभव आम्हाला आले नसते तर आम्ही आत्ता जे सांगत आहोत ते तसे सांगितलेच नसते.
या शक्तीचे परिणामच इंद्रियसंवेद्य असतात असे नाही तर, तिच्या गतिविधीसुद्धा इंद्रियसंवेद्य आणि मूर्त असतात. शक्तीची किंवा ऊर्जाशक्तीची जाणीव झाल्याचे मी जेव्हा म्हणतो तेव्हा तिची अगदी ठोस जाणीव मला असते आणि परिणामतः मी तिला दिशा देऊ शकतो, तिला हाताळू शकतो, तिच्या गतिविधींचे निरीक्षण करू शकतो, तिच्या वस्तुमानाविषयी आणि तिच्या तीव्रतेविषयी मी सचेत असतो, इतर विरोधी शक्तींबाबत मला जशी जाणीव असते तशीच ती या शक्तीबाबतही असते, या सर्व गोष्टी योगाच्या विकासामुळे शक्य होतात आणि त्या नित्याच्या असतात.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 181-182)
‘योगशक्ती’ आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली…
(ईश्वराचे माध्यम झाल्याचा अनुभव कसा असतो, ते श्रीमाताजींनी विशद केले. त्यानंतर साधक आणि त्यांच्यामध्ये…
(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत…
एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता…
आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले…