(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा पुढचा भाग…)
स्वतःवर अवलंबून राहण्याची जाणीव ही मनुष्याच्या जन्माबरोबर उदयास आली आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसल्यामुळे, कायमचेच क्लेश, त्रास त्याच्या वाट्याला आलेले आहेत. मनुष्य जर त्याच्या स्वतःच्या चेतनेपेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत पूर्णपणे समर्पित होऊ शकला, म्हणजे त्याने स्वतःला जर त्या चेतनेच्या हाती सोपविले आणि त्याच्या काळज्या, चिंता त्या चेतनेच्या हाती सोपविल्या, तसेच स्वतःच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची व सर्व गोष्टींची सुव्यवस्था लावण्याची जबाबदारी त्याने जर त्या चेतनेच्या हाती सोपविली तरच त्याचे सर्व क्लेश, त्रास संपुष्टात येऊ शकतील.
एखादा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर, ती व्यक्ती तो प्रश्न सोडवणार तरी कसा? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, मनुष्याला वाटते की, त्याच्या जीवनाचे सर्व प्रश्न त्याने स्वतःच सोडविले पाहिजेत. मात्र तसे करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसते. ‘मी काय केले पाहिजे?’ हा एक प्रश्न त्याला कायम भेडसावत असतो; त्याच्या पाठोपाठ त्याला जोडून येणारा दुसरा अधिकच गंभीर प्रश्न म्हणजे, ‘उद्या काय होईल कोण जाणे?’ मात्र या प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता त्याच्यापाशी नसते. आणि इथेच सर्व अडचणींचे मूळ आहे. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 09 : 304)
(चैत्य दृष्टिकोनातून माणसापेक्षा एखादे गुलाबाचे फुलदेखील किती चांगले असू शकते ते श्रीमाताजींनी सांगितले, हे आपण…
आंतरात्मिक चेतनेच्या अनेकविध सुंदर रूपांमधील नि:स्वार्थी, निरपेक्ष कृती हे या जगातील एक सर्वोत्तम रूप आहे.…
‘सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि फक्त ईश्वराप्रति अभिमुख होण्याची इच्छा या गोष्टी म्हणजे चैत्य पुरुष…
मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही)…
पूर्णयोगासाठी व्यक्तीची तयारी असणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ 'पूर्णयोगाची क्षमता असणे’ असा नसून…
तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्या'चा शोध घेण्याची आणि त्या ‘सत्या’चे…