जगाची नवनिर्मिती तरुणच करतील
भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे आणि त्याची निर्मिती तरुणांनीच केली पाहिजे. हे जग जसे नूतन आहे तसेच ते सत्य, धैर्य, न्याय, उदात्त आकांक्षा आणि निखालस परिपूर्तीचे सुद्धा आहे. आपण असे जग निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
भ्याड लोकांना किंवा जे स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत आहेत अशा लोकांना किंवा नुसत्या वाचाळवीरांना, म्हणजे जे आरंभशूर असतात आणि त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अनुयायांना जे तसेच गर्तेत सोडून देतात अशा लोकांना, भावी घडामोडीच्या काळामध्ये कोणताही थारा नाही.
ज्या पायावर राष्ट्राचे भवितव्य उभारले जाऊ शकते तो एकमेव पाया म्हणजे धाडसी, मोकळे, प्रांजळ, शुद्ध अंतःकरणाचे, धैर्यशील आणि आकांक्षा बाळगणारे तरुण.
– श्रीअरविंद (CWSA 08 : 168)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- ‘परमानंद’ हे विश्वाचे रहस्य - July 15, 2026
- जग – ईश्वराचे आविष्करण - July 14, 2026
- विश्व आणि विकासक्रम - July 9, 2026







