(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘गृहस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)
गृहस्थाश्रम
ब्रह्मचर्याश्रमामध्ये संपादन केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याच्या दृष्टीने आर्य मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे आणि त्याद्वारे त्याला मानवी जीवनाची (अर्थ, काम व धर्म ही) पहिली तीन उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असे. गृहस्थाश्रमामध्ये असताना त्याला त्याच्या स्वाभाविक अस्तित्वाची, त्याच्या आवडीनिवडींची, जीवनानंद घेण्याच्या इच्छेची पूर्ती करता येत असे; तो समाजऋण फेडत असे; समाजाच्या गरजा पुरवत असे आणि अशा रितीने स्वतःच्या जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांची परिपूर्ती करून, तो जीवनाच्या अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाच्या प्रयोजनासाठी स्वतःची तयारी करत असे. (क्रमश:)
• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…
जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…
साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…