(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘गृहस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)
गृहस्थाश्रम
ब्रह्मचर्याश्रमामध्ये संपादन केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याच्या दृष्टीने आर्य मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे आणि त्याद्वारे त्याला मानवी जीवनाची (अर्थ, काम व धर्म ही) पहिली तीन उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असे. गृहस्थाश्रमामध्ये असताना त्याला त्याच्या स्वाभाविक अस्तित्वाची, त्याच्या आवडीनिवडींची, जीवनानंद घेण्याच्या इच्छेची पूर्ती करता येत असे; तो समाजऋण फेडत असे; समाजाच्या गरजा पुरवत असे आणि अशा रितीने स्वतःच्या जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांची परिपूर्ती करून, तो जीवनाच्या अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाच्या प्रयोजनासाठी स्वतःची तयारी करत असे. (क्रमश:)
• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)
(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत.…
प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते. * निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे. • श्रीमाताजी…
तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक…
(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत...) साधक : एखाद्या व्यक्तीला…
(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले.…
(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले…