अस्तित्वाच्या विविध घटकांमध्ये परस्परांमध्ये दुफळी असणे हा अप्रामाणिकपणा असतो. तुमचा देह आणि तुमच्या अस्तित्वाचे सत्य या दोहोंमध्ये खोल दरी असणे हा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा या दरीमुळे तुमचे खरे अस्तित्व तुमच्या देहापासून विलग होते तेव्हा प्रकृती ती दरी सर्व प्रकारच्या विरोधी सूचनांच्या मदतीने तत्काळ भरून टाकते. भीती ही त्यातील सर्वात भयानक सूचना असते तर शंका ही त्यातील सर्वात घातक सूचना असते. कोठेही कोणत्याच गोष्टीमुळे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याला नकार न देणे, हा प्रामाणिकपणा असतो.
– श्रीमाताजी (Growing up with the Mother by Tara Jauhar : 165)
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…