जीवन जगण्याचे शास्त्र – ०८
सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो.
*
साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते उत्तमातील उत्तम रितीने करायचे; प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची आणि तुम्ही काय केले पाहिजे व कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या जगातील सारेकाही जो जाणतो त्या ईश्वराला घेऊ द्यायचा, हे उचित असते. तेव्हा व्यक्ती चिंतामुक्त असते आणि ती पूर्णपणे आनंदी राहू शकते.
– श्रीमाताजी (CWM 17 : 18) & (CWM 06 : 248)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…