जीवन जगण्याचे शास्त्र – ०७
साधक : कधीकधी मला असे वाटते की, मी माझ्या सर्व दैनंदिन गोष्टी (उदाहरणार्थ मैदानावर खेळणे, वाद्यवादन, अभ्यास इत्यादी) सोडून द्याव्यात आणि सर्व वेळ फक्त (तुम्ही नेमून दिलेल्या) कामावरच लक्ष केंद्रित करावे. पण माझ्या तर्कबुद्धीला हे पटत नाही. माझ्या मनात ही अशी कल्पना कोठून आणि का येते?
श्रीमाताजी : येथे तुमची तर्कबुद्धी जे सांगत आहे ते योग्य आहे. जटिल परिस्थितीला तोंड न देता, जगण्याची परिस्थितीच सोपी करण्याची एक तामसिक प्रवृत्ती बाह्य प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येते. परंतु तुम्हाला जर सर्वांगीण प्रगती करायची असेल तर, अशा प्रकारचे सुलभीकरण (simplification) करणे तितकेसे इष्ट नाही.
– श्रीमाताजी (CWM 16 : 301)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…