जीवन जगण्याचे शास्त्र – ०७
साधक : कधीकधी मला असे वाटते की, मी माझ्या सर्व दैनंदिन गोष्टी (उदाहरणार्थ मैदानावर खेळणे, वाद्यवादन, अभ्यास इत्यादी) सोडून द्याव्यात आणि सर्व वेळ फक्त (तुम्ही नेमून दिलेल्या) कामावरच लक्ष केंद्रित करावे. पण माझ्या तर्कबुद्धीला हे पटत नाही. माझ्या मनात ही अशी कल्पना कोठून आणि का येते?
श्रीमाताजी : येथे तुमची तर्कबुद्धी जे सांगत आहे ते योग्य आहे. जटिल परिस्थितीला तोंड न देता, जगण्याची परिस्थितीच सोपी करण्याची एक तामसिक प्रवृत्ती बाह्य प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येते. परंतु तुम्हाला जर सर्वांगीण प्रगती करायची असेल तर, अशा प्रकारचे सुलभीकरण (simplification) करणे तितकेसे इष्ट नाही.
– श्रीमाताजी (CWM 16 : 301)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…