भारताचे पुनरुत्थान – ०८
(श्री. अरविंद घोष यांनी ३१ जानेवारी १९०८ रोजी नागपूर येथे केलेल्या भाषणातील अंशभाग)
राष्ट्राचा आत्मसन्मान हाच आपला धर्म आणि आत्मयज्ञ हीच आपली एकमेव कृती किंवा हेच आपले एकमेव कर्तव्य! आपल्यामधील दैवी गुण प्रकट व्हावेत यासाठी आपण पुरेसा वाव दिला पाहिजे. क्षुल्लक भावनांचा त्याग केला पाहिजे. मरणाचा प्रसंग आला तरी घाबरता कामा नये.
मागे हटू नका; राष्ट्रासाठी यातना सहन करा. ईश्वर हाच तुमचा आधार आहे. तुम्ही जर असे केलेत तर भारताला त्वरित त्याचे गतवैभव आणि कीर्ती पुन्हा प्राप्त होईल. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून भारत उभा राहील. तो इतर राष्ट्रांना शिक्षित करेल; त्याच्यामधून खऱ्या ज्ञानाचे तेज ओसंडून वाहील आणि भारत वेदान्ताची तत्त्वे रुजवेल. आपले राष्ट्र हे मानववंशाच्या आणि संपूर्ण जगाच्या हितासाठी पुढे सरसावेल. संपूर्ण जग हे त्याच्याद्वारे संचालित केले जाईल. पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचे ऋण फेडण्यास तयार होऊ तेव्हाच हे घडून येईल.
– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 860)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…