श्रीमाताजी या अनंतरूपधारिणी आहेत हे खरे आहे, पण आंतरिक रूपातील श्रीमाताजी आणि दृश्य रूपातील श्रीमाताजी यांच्यामध्ये फार फरक करता कामा नये. कारण केवळ दृश्यरूपात दिसणाऱ्या श्रीमाताजीच तेवढ्या अस्तित्वात आहेत असे नाही तर, त्यांच्यामध्येच त्यांची इतर अनेक रूपं सामावलेली आहेत आणि त्यांच्यामध्येच आंतरिक अस्तित्व व बाह्य अस्तित्व यांच्यामधील सुसंवाद प्रस्थापित झालेला आहे.
परंतु दृश्य रूपातील श्रीमाताजींना खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी, व्यक्तीने केवळ त्यांच्या बाह्य रूपाकडे पाहता कामा नये तर, त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. व्यक्ती जर त्यांना अंतरंगाद्वारे भेटेल आणि त्यांच्या चेतनेमध्ये वृद्धिंगत होईल तरच हे जाणणे शक्य होते. जे कोणी त्यांच्याशी फक्त बाह्यतः नाते ठेवू पाहतात त्यांना ते समजणे शक्य नाही.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 483)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…