श्रीमाताजी आणि समीपता – २९
(श्रीमाताजींनी मला दूर लोटले आहे, त्या माझ्यावर नाराज आहेत, माझ्यापेक्षा त्या इतरांवर अधिक कृपा करतात अशा प्रकारच्या कल्पना, विचार हे साधकांच्या मार्गामधील अडथळे असतात, त्यापासून साधकांनी कटाक्षाने दूर राहिले पाहिजे; हे श्रीअरविंदांनी एका साधकाला पत्रामधून लिहिले आहे. असे विचार मनात निर्माणच होऊ नयेत म्हणून कोणती पथ्यं पाळली पाहिजेत, कोणत्या तीन नियमांच्या पालनापासून त्याची सुरूवात केली पाहिजे हे श्रीअरविंद येथे लिहीत आहेत…)
१) श्रीमाताजी तुमची जी काळजी घेत असतात, तुमच्यावर जे प्रेम करत असतात त्याबद्दल तुम्ही नेहमी विश्वास बाळगला पाहिजे; त्याविषयी खात्री बाळगली पाहिजे आणि त्याच्याशी विसंगत दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवता कामा नये.
२) श्रीमाताजींसोबत तुमचे जे खरेखुरे नाते आहे, त्यांच्यासोबत तुमची जी आंतरिक जवळीक आहे, त्यांच्याबाबत तुम्हाला जो एक साधासरळ विश्वास वाटतो त्यापासून, दूर नेणाऱ्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक आवेगाला तुम्ही त्वरित नकार दिला पाहिजे.
३) बाह्य लक्षणांवर जास्त भर देऊ नका; (कारण) त्या बाबतीतल्या तुमच्या निरीक्षणामुळे तुमची सहजगत्या दिशाभूल होऊ शकते. तुम्ही श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले ठेवा आणि तुमच्या हृदयातून, अंतःकरणातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पृष्ठवर्ती प्राणिक इच्छांच्या माध्यमातून नव्हे तर, तुमच्या खऱ्या भावनांच्या गाभ्यातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे मग त्या तुम्हाला गवसण्याची अधिक शक्यता असते आणि मग श्रीमाताजी तुमच्या अंतरंगामध्ये, नेहमीच तुमच्या समीप असण्याची आणि त्या तुम्हाला जे प्रदान करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत ते तुम्ही ग्रहण करू शकता.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 489)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…