श्रीमाताजी आणि समीपता – २८
ईश्वरी प्रभावाशिवाय अन्य कोणतेही प्रभाव (influences) स्वीकारायचे नाहीत, ही गोष्ट साध्य करून घेण्यासारखी आहे; कारण सहसा मानवी प्रकृती ईश्वरी प्रभाव न स्वीकारता इतरच प्रभाव स्वीकारत असते. श्रीमाताजींच्या दिव्य प्रकाशाच्या आणि दिव्य शक्तीच्या एकमेव प्रभावाखाली राहिल्याने, प्रकृतीमधील जे जे काही बदलणे आवश्यक असते ते, शांतपणे व सहजतेने बदलता येऊ शकते आणि प्रकृतीमधील जे काही विकसित करणे आवश्यक असते ते, कोणत्याही अडथळ्याविना किंवा त्रासाविना विकसित करता येऊ शकते.
*
श्रीमाताजींसोबत असणाऱ्या थेट नात्याचा मार्ग तुमच्यासाठी नेहमीच खुला असतो आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा तेव्हा तो मार्ग तिथे असतोच, कारण ही गोष्ट आंतरिक अस्तित्वाशी संबंधित असते. जेव्हा कधी तुम्ही अंतरंगात खोलवर प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला ते नाते गवसेलच; मात्र त्याने पृष्ठस्तरावर येऊन, बाह्य प्रकृतीचे आणि बाह्य जीवनाचे शासन (govern) करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच तुम्ही अंतरंगामध्ये प्रविष्ट होण्यासाठी आणि साधनेमध्ये आंतरिक प्रगती करण्यासाठी काही वेळ द्यावा असे मला वाटते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 486-487)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…