साधना, योग आणि रूपांतरण – १६५
पूर्णयोगांतर्गत भक्ती
(एका साधकाने श्रीअरविंद यांना दिव्य प्रेमासंबंधी काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)
‘दिव्य प्रेम’ हे मानवी प्रेमाप्रमाणे नसते, तर ते गहन, व्यापक आणि प्रशांत असते. त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने अविचल आणि विशाल झाले पाहिजे. जे गरजेचे आहे (असे त्या व्यक्तीला वाटते) त्याची पूर्ती करायची किंवा नाही हा निर्णय व्यक्तीने ‘दिव्य प्रज्ञे’वर आणि ‘दिव्य प्रेमा’वर सोपविला पाहिजे. आणि ‘दिव्य प्रेमा’प्रत समर्पित होणे हेच व्यक्तीचे समग्र उद्दिष्ट असले पाहिजे; जेणेकरून ती व्यक्ती धारकपात्र आणि साधन बनू शकेल.
“अमुक एका कालावधीमध्येच माझी प्रगती झाली पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि मला साक्षात्कार झाला पाहिजे,” अशा गोष्टींचा व्यक्तीने आग्रह धरता कामा नये, या गोष्टीची तिने मनामध्ये पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी कितीही कालावधी लागला तरी, त्यासाठी थांबण्याची आणि चिकाटीने प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. तिने तिचे संपूर्ण जीवन हे त्या एकमेव गोष्टीप्रत म्हणजे ‘ईश्वरा’प्रत असलेली उन्मुखता आणि अभीप्सा, यांसाठी वाहून घेतले पाहिजे.
कशाची तरी मागणी करणे आणि काहीतरी संपादन करणे हे नव्हे तर, स्वतःला अर्पण करणे हे साधनेचे रहस्य असते. व्यक्ती जेवढे आत्मदान करते तेवढ्या प्रमाणात तिची ग्रहणक्षमता वृद्धिंगत होते. परंतु त्यासाठी (तिच्या स्वभावातील) अधीरता आणि बंडखोर वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. “मला काही साध्यच होत नाहीये, मला कोणाचे साहाय्य मिळत नाहीये, माझ्यावर कोणाचे प्रेमच नाहीये, आता मी निघून जातो, आता मी अध्यात्मसाधनेचा किंवा या जीवनाचाच त्याग करतो,” (आतून उमटणाऱ्या) अशा प्रकारच्या सर्व सूचनांना त्या व्यक्तीने धुडकावून दिले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 345)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…