साधना, योग आणि रूपांतरण – १४७
पूर्णयोगांतर्गत भक्ती
नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच! केवळ मनाद्वारे केलेली पुनरावृत्ती पुरेशी नसते.
*
कोणत्याही देवदेवतेचे नामस्मरण केले तरी त्या नामस्मरणाला प्रतिसाद देणारी ‘शक्ती’ म्हणजे (स्वयं) श्रीमाताजीच असतात. प्रत्येक नामाद्वारे ईश्वराच्या एका विशिष्ट पैलूचा निर्देश होतो आणि ते नाम त्या पैलूपुरतेच मर्यादित असते; श्रीमाताजींची शक्ती मात्र वैश्विक आहे.
*
साहजिकच आहे की, व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये ज्या कोणत्या नामावर लक्ष केंद्रित करते, ते नाम निद्रावस्थेमध्येसुद्धा आपोआप पुनरावृत्त होत राहते. परंतु निद्रावस्थेमध्ये श्रीमाताजींच्या नामाचा धावा करणे हे नामस्मरणच असेल असे नाही. बरेचदा असे होते की, आंतरिक पुरुष अडचणीमध्ये असताना किंवा त्याला तशी निकड जाणवत असेल तर तो श्रीमाताजींना आवाहन करत असतो.
*
श्वासाबरोबर नामस्मरण करण्यास मी फारसे प्रोत्साहन देत नाही कारण मग ते प्राणायामासारखे होते. प्राणायाम ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे, परंतु प्राणायाम जर घाईगडबडीने केला गेला तर त्यातून अडथळे निर्माण होऊ शकतात आणि अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे शरीराला आजारपण येऊ शकते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 327)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…