साधना, योग आणि रूपांतरण – १४७
पूर्णयोगांतर्गत भक्ती
नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच! केवळ मनाद्वारे केलेली पुनरावृत्ती पुरेशी नसते.
*
कोणत्याही देवदेवतेचे नामस्मरण केले तरी त्या नामस्मरणाला प्रतिसाद देणारी ‘शक्ती’ म्हणजे (स्वयं) श्रीमाताजीच असतात. प्रत्येक नामाद्वारे ईश्वराच्या एका विशिष्ट पैलूचा निर्देश होतो आणि ते नाम त्या पैलूपुरतेच मर्यादित असते; श्रीमाताजींची शक्ती मात्र वैश्विक आहे.
*
साहजिकच आहे की, व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये ज्या कोणत्या नामावर लक्ष केंद्रित करते, ते नाम निद्रावस्थेमध्येसुद्धा आपोआप पुनरावृत्त होत राहते. परंतु निद्रावस्थेमध्ये श्रीमाताजींच्या नामाचा धावा करणे हे नामस्मरणच असेल असे नाही. बरेचदा असे होते की, आंतरिक पुरुष अडचणीमध्ये असताना किंवा त्याला तशी निकड जाणवत असेल तर तो श्रीमाताजींना आवाहन करत असतो.
*
श्वासाबरोबर नामस्मरण करण्यास मी फारसे प्रोत्साहन देत नाही कारण मग ते प्राणायामासारखे होते. प्राणायाम ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे, परंतु प्राणायाम जर घाईगडबडीने केला गेला तर त्यातून अडथळे निर्माण होऊ शकतात आणि अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे शरीराला आजारपण येऊ शकते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 327)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…