साधना, योग आणि रूपांतरण – १३३
तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे त्यासंबंधी अटकळ बांधण्यामध्ये तुमच्या मनाला उगाच आधीपासूनच शीणवू नका. मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग असतात, या सवयी टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत असते; परंतु शारीर-मनाने त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण असते. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ त्या कर्माच्या वेळी त्याकडे लक्ष पुरवेल. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याची कृती करू द्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. खरंतर, अतिमानसिक क्रियेने (तुमच्या) शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती करण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 287)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…