साधना, योग आणि रूपांतरण – ७८
साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.”
श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था आहे); समाधीला या योगामध्ये प्रतिबंध करण्यात आलेला नाही. श्रीमाताजी नेहमी समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट होतात ही गोष्ट हा त्याचा पुरेसा पुरावा आहे. मी जेव्हा तुम्हाला तसे म्हणालो होतो तेव्हा ‘’समाधीची कधीच आवश्यकता नाही किंवा ती कधीच उपयुक्त नाही’’, अशा अर्थाचे ते सार्वत्रिक विधान नव्हते तर, ते विधान तुमच्या तेव्हाच्या गरजेला अनुसरून केलेले होते. (विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट संदर्भाने, विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेली) विशिष्ट विधाने मनाद्वारे अनन्य आणि त्रिकालाबाधित नियमामध्ये परिवर्तित करू नयेत.
*
समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही पण ती अधिकाधिक चेतनायुक्त करणे आवश्यक असते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 41), (CWSA 30 : 250)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…