आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४)
(एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)
आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, प्राण, शरीर यांमधील) संघर्षाला आमंत्रण देऊन, तो टोकाला नेऊन त्याला तीव्र करण्यासारखे आहे आणि ते पेलण्याची (तुमच्या) प्रकृतीची अजून तयारी झालेली नाही.
तुम्ही आध्यात्मिक ध्येय नजरेसमोर ठेवून, त्याद्वारे कर्मयोगाच्या वृत्तीने, क्रमाक्रमाने, तुमच्या जीवनाचे सुशासन करण्याचा प्रयत्न करत, तुमच्यामधील प्राणिक घटकांना काही अंशी जीवनानुभवांद्वारे आणि शिस्तीद्वारे वळण लावले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 543)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…