‘देव’भूमी असलेल्या भारतामध्ये ऋषीमुनी, योगी, संतसत्पुरूष, महात्मे यांची कधीच वानवा नव्हती. त्यांच्या तपाचरणाचा प्रभाव म्हणा किंवा सत्संगाचा प्रभाव म्हणा, पण भारतामध्ये रहिवास करणाऱ्या आबालवृद्धांना जणू आध्यात्मिकतेचे बाळकडूच मिळालेले असते. परंतु त्याच्या अतिपरिचयामुळे असेल कदाचित पण सामान्य जनांमध्ये ‘आध्यात्मिकता’ या गोष्टीबद्दल विविध समजुती असलेल्या आढळतात. त्यांची सत्यासत्यता पारखून, श्रीअरविंद आपल्याला आध्यात्मिकता म्हणजे काय आणि काय नाही, हे खुलासेवार स्पष्ट करतात.
एकदा आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजले की, त्याला जोडूनच पुढचा प्रश्न येतो. आणि तो म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आध्यात्मिकतेचे अनुसरण कसे करायचे. याबद्दलचे मार्गदर्शनही उद्यापासून सुरु होत असलेल्या ‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये वाचकांना लाभेल, असा विश्वास वाटतो.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…