एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसंचय आणि त्याच्याकडे असणारे अगदी अंतर्ज्ञानदेखील त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नसते. तसेच जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते, हे सुद्धा त्याला माहीत नसते. जोपर्यंत स्वत:मध्ये असलेल्या या ‘आद्या’विषयी (origin) तो जागृत होत नाही तोवर माणसाला विश्वाच्या ‘आद्या’विषयी ज्ञान कसे बरे होईल?
– श्रीमाताजी [CWM 02 : 40]
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…