कर्म आराधना – २१
कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती वृत्ती महत्त्वाची असते. ते कर्म गीतेमध्ये सांगितलेल्या वृत्तीने म्हणजे इच्छाविरहितपणे, निर्लिप्तपणे, कोणत्याही तिटकाऱ्याविना पण शक्य तितके अचूकपणे केले पाहिजे. ते कुटुंबीयांसाठी, पदोन्नतीसाठी किंवा वरिष्ठांची खुशामत करण्यासाठी करता कामा नये तर, ते तुमच्यावर सोपविण्यात आले आहे यासाठीच केले पाहिजे. आंतरिक प्रशिक्षणाचे क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, यापेक्षा अधिक काही नाही. व्यक्तीने त्यातून समता, इच्छाविरहितता आणि निष्ठा या तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. कर्म ही कर्मासाठी करायची गोष्ट नसते तर, व्यक्तीने स्वतःची कर्मपरता आणि स्वतःची कर्मपद्धती ईश्वराला अर्पण करायची असते. अशा वृत्तीने कर्म केले तर, ते कर्म कोणते आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. व्यक्तीने स्वतःला अशा प्रकारे आध्यात्मिक रीतीने घडविले तर, तिला एखाद्या दिवशी थेट ईश्वरासाठीचे काम जर सोपविण्यात आले (जसे आश्रमाचे काम) तर, ते योग्य रीतीने करण्यासाठी ती व्यक्ती सज्ज असेल.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 240-241)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…