सद्भावना – २२
सर्वांत बाह्यवर्ती शारीरिक चेतना आणि चैत्य चेतना (Psychic Consciousness) या दोहोंमध्ये नित्य संपर्क प्रस्थापित करणे हे स्वाभाविकपणेच अतिशय कठीण असते. आणि या शारीरिक चेतनेपाशी भरपूर सद्भावना असते; ती अतिशय नियमित असते, ती खूप धडपड करते, पण ती मंद आणि जड असते, तिला खूप वेळ लागतो, ती प्रगत होणे कठीण असते. ती थकत नाही, पण ती आपणहून प्रयत्नही करत नाही, ती तिच्या मार्गाने, शांतपणे वाटचाल करत असते. बाह्य चेतनेला चैत्य पुरुषाच्या संपर्कात येण्यासाठी (कदाचित) कित्येक शतकेदेखील लागू शकतात. परंतु या ना त्या कारणास्तव प्राण (vital) त्यामध्ये हातभार लावतो. एक आवेग त्याचा ताबा घेतो. ते कारण नेहमी आध्यात्मिकच असते असे नाही, पण या ना त्या कारणासाठी, प्राणाला तो संपर्क हवाहवासा असतो. तो संपर्क प्रस्थापित व्हावा अशी त्याची मनीषा असते. आपल्या साऱ्या ऊर्जेनिशी, आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी, साऱ्या आवेगांनिशी, जोमानिशी त्याला तो संपर्क हवा असतो : तीन महिन्यांमध्ये ती गोष्ट साध्य होऊ शकते.
त्यामुळे प्राणाला हाताळताना फार काळजी घेतली पाहिजे. त्याला मोठ्या काळजीपूर्वकतेने वागणूक द्या पण त्याच्यासमोर नमते घेऊ नका. अन्यथा तो तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासदायक आणि अप्रिय प्रयोगांकडे खेचून नेईल. परंतु या ना त्या प्रकारे तुम्ही जर का त्याला पटवून देण्यात यशस्वी झालात तर, तुम्ही मार्गावर प्रचंड प्रगती करू शकाल.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 257-258)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…