सद्भावना – २०
विद्यार्थ्यांसमोर आदर्श उदाहरण ठेवा. ते जसे घडावेत असे तुम्हाला वाटते तसे आधी तुम्ही स्वतः बना. तुम्ही निरपेक्षपणाचे, सहनशीलतेचे, आत्म-नियंत्रणाचे, स्वतःच्या छोट्याछोट्या वैयक्तिक नापसंतींवर मात करण्याचे, सातत्यपूर्ण चांगल्या खेळकर विनोदाचे, सातत्यपूर्ण सद्भावनेचे, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचे उदाहरण त्यांच्या नजरेसमोर ठेवा; स्वभावातील समत्वाचे उदाहरण त्यांना घालून द्या की, ज्यामुळे मुलं भयमुक्त होतील. भीतीमुळेच ती कपटी, अप्रामाणिक आणि इतकेच काय पण धूर्तसुद्धा बनतात, आपल्याला शिक्षा होईल या भीतीने ती तशी बनतात. मात्र तुमच्याबद्दल जर त्यांना विश्वास वाटला तर ते तुमच्यापासून काहीही लपविणार नाहीत आणि मग ते निष्ठावान व प्रामाणिक व्हावेत यासाठी तुम्ही त्यांना साहाय्य करू शकाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श उदाहरण ठेवले पाहिजे! श्रीअरविंद त्याविषयी म्हणतात, व्यक्तीमध्ये सर्व परिस्थितीत अविचल राहील अशी चांगली विनोदबुद्धी असली पाहिजे, स्वतःला विसरून जाण्याची क्षमता असली पाहिजे; व्यक्तीने स्वतःच्या छोट्याछोट्या त्रासदायक गोष्टी इतरांवर लादता कामा नयेत, व्यक्ती दमलेली असेल किंवा अस्वस्थ असेल, तेव्हासुद्धा तिने चिडचिडे, अधीर होता कामा नये. यासाठी काहीशा पूर्णत्वाची, आत्म-नियंत्रणाची आवश्यकता असते, की जे साक्षात्काराच्या मार्गावरील एक मोठे पाऊल असते. खरा अग्रणी (leader) बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या अटींची परिपूर्ती जो कोणी करेल, मग भलेही तो लहान मुलांच्या एखाद्या छोट्याशा गटाचा नायक का असेना, तो योगसिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनेबाबत पुष्कळच प्रगत झालेला असतो.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 81)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…