ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

खरीखुरी विनम्रता

सद्भावना – १६

आश्रमात येणाऱ्या दर्शनार्थींचे स्वागत करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे असते त्या व्यक्तींचे आचरण नेहमीच अतिशय विनम्र आणि मृदु असले पाहिजे, अशी श्रीमाताजींची अपेक्षा असते. कोणी उच्च असू दे वा कनिष्ठ, कोणी तरुण असू देत वा वयस्कर, त्यांनी उत्तमोत्तम पोषाख परिधान केलेला असू दे वा अगदी फाटक्या कपड्यातील असू देत, साऱ्यांचे स्वागत सारख्याच सद्भावनेने आणि सदाचाराने झाले पाहिजे. चांगल्या पोषाखातील व्यक्ती आश्रमातील स्वागतासाठी जास्त सुयोग्य आहेत असे मानण्याची काहीच गरज नाही. एखाद्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या सामान्य माणसापेक्षा मोटार गाडीतून आलेल्या माणसांची आपण अधिक काळजी घेत आहोत, असे कदापिही घडता कामा नये. आपल्यासारखीच ती देखील माणसं आहेत हे आपण कदापिही विसरता कामा नये आणि आपण श्रेणीच्या सर्वोच्च स्थानी आहोत, असे समजण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
आणि आपली विनम्रता ही केवळ बाह्य स्वरूपाची असता कामा नये, येथे खरीखुरी विनम्रता, अभिप्रेत आहे. जी आतून आलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 167)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

19 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago