ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधकाची तयारी महत्त्वाची

ईश्वरी कृपा – २७

‘ईश्वरी-कृपे’विना काहीच केले जाऊ शकत नाही, परंतु ती ‘कृपा’ पूर्णतः अभिव्यक्त व्हायची असेल तर, साधकाने स्वतःची सिद्धता करणे आवश्यक असते. साऱ्याच गोष्टी जर ‘ईश्वरी’ हस्तक्षेपावर अवलंबून असत्या तर, मनुष्य एक कळसूत्री बाहुली बनून राहिला असता आणि मग साधनेचा काही उपयोगच झाला नसता! आणि मग ना कोणत्या अटी, ना कोणते वस्तुंचे नियम, आणि त्यामुळे ना कोणते जग… केवळ ‘ईश्वर’ त्याच्या सुखासाठी वस्तुंशी खेळत आहे, असे झाले असते. अंतिमतः साऱ्याच गोष्टी ‘ईश्वरी’ वैश्विक कार्यामुळेच होतात, असे निःशंकपणे म्हणता येते, पण हे सारे व्यक्तींच्या माध्यमातून घडत असते, हे ईश्वरी वैश्विक कार्य शक्तींच्या माध्यमातून, ‘प्रकृति’च्या नियमांनुसार घडत असते. ‘ईश्वरा’चा विशेष हस्तक्षेप असू शकतो आणि असतो देखील पण साऱ्याच गोष्टी काही या विशेष हस्तक्षेपामुळे घडून येत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 171)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

14 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago