साधकाची तयारी महत्त्वाची
ईश्वरी कृपा – २७
‘ईश्वरी-कृपे’विना काहीच केले जाऊ शकत नाही, परंतु ती ‘कृपा’ पूर्णतः अभिव्यक्त व्हायची असेल तर, साधकाने स्वतःची सिद्धता करणे आवश्यक असते. साऱ्याच गोष्टी जर ‘ईश्वरी’ हस्तक्षेपावर अवलंबून असत्या तर, मनुष्य एक कळसूत्री बाहुली बनून राहिला असता आणि मग साधनेचा काही उपयोगच झाला नसता! आणि मग ना कोणत्या अटी, ना कोणते वस्तुंचे नियम, आणि त्यामुळे ना कोणते जग… केवळ ‘ईश्वर’ त्याच्या सुखासाठी वस्तुंशी खेळत आहे, असे झाले असते. अंतिमतः साऱ्याच गोष्टी ‘ईश्वरी’ वैश्विक कार्यामुळेच होतात, असे निःशंकपणे म्हणता येते, पण हे सारे व्यक्तींच्या माध्यमातून घडत असते, हे ईश्वरी वैश्विक कार्य शक्तींच्या माध्यमातून, ‘प्रकृति’च्या नियमांनुसार घडत असते. ‘ईश्वरा’चा विशेष हस्तक्षेप असू शकतो आणि असतो देखील पण साऱ्याच गोष्टी काही या विशेष हस्तक्षेपामुळे घडून येत नाहीत.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 171)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







