ईश्वरी कृपा – २५
हे तर अगदी स्वाभाविक आहे की, एकच संपर्क किंवा एकच घटना एखाद्या व्यक्तिमध्ये सुखाची तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तिमध्ये वेदनेची भावना निर्माण करते, प्रत्येक व्यक्ती कोणता आंतरिक दृष्टिकोन बाळगते यावर ते अवलंबून असते. आणि पुढे हेच निरीक्षण एका अधिक महान अशा साक्षात्काराप्रत घेऊन जाते. परमेश्वर हा सर्व वस्तुमात्रांचा निर्माणकर्ता आहे, हे एकदा एखाद्या व्यक्तिला उमगले, नुसते उमगलेच नाही तर जाणवलेसुद्धा, आणि जर ती व्यक्ती त्या परमेश्वराच्या नित्य संपर्कात राहिली तर, सारे काही त्या ‘ईश्वरी कृपे’ची कृतीच बनून जाते आणि सारे काही स्थिर व तेजोमय आनंदामध्ये बदलून जाते.
– श्रीमाताजी
(CWM 10 : 245)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…