ईश्वरी कृपा – ०२
‘ईश्वरी कृपे’वरील तुमचा विश्वास आणि श्रद्धा कितीही अगाध असली; प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणाला, जीवनातील प्रत्येक अवस्थेत ‘ईश्वरी कृपा’च कार्यरत आहे, हे पाहण्याची तुमची क्षमता कितीही महान असली तरी, तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची अद्भुत विशालता, त्या कार्यपूर्तीमधील बारकावा, त्यातील अचूकता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. जगातील परिस्थिती विचारात घेता, ईश्वरी साक्षात्काराप्रत चाललेली वाटचाल ही अधिक वेगवान, अधिक परिपूर्ण, शक्य तेवढी अधिक समग्र आणि सुसंवादी व्हावी या दृष्टीने, ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते, सर्व गोष्टींच्या पाठीमागे तीच कशी असते, सर्व गोष्टी ती कशा सुसंघटित करते, त्यांचे संयोजन कसे करते, हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही.
मात्र ज्या क्षणी तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या संपर्कात येता, तत्क्षणी अवकाशातील एकेक बिंदू, आणि काळातील प्रत्येक क्षण, तुम्हाला त्या ‘ईश्वरी कृपे’चे निरंतर चालणारे कार्य, ‘ईश्वरी कृपे’ची सातत्यपूर्ण मध्यस्थी (Intervention) नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो.
आणि एकदा का तुम्हाला त्याचे दर्शन झाले की, मग तुमच्या लक्षात येते की, तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला कधीही भीती, अस्वस्थता, पश्चात्ताप किंवा संकोच वाटता कामा नये, किंवा अगदी दुःखभोगही जाणवता कामा नयेत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, जर तिला ‘ईश्वरी कृपा’ सर्वत्र दिसू लागली की, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे जीवन जगू लागेल.
आणि असे जीवन जगणे हाच ‘ईश्वरी कार्या’तील सर्वोत्तम शक्य असा सहयोग असेल.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 250)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…