खरे प्रेम एकच असते आणि ते प्रेम म्हणजे ‘ईश्वरी प्रेम’; प्रेमाची इतर सर्व रूपं म्हणजे त्या ईश्वरी प्रेमाची विरूपे असतात, त्या प्रेमाची संकुचित, मर्यादित रूपं असतात. अगदी भक्ताचे देवावरील प्रेम हे सुद्धा एक प्रकारे प्रेमाचा ऱ्हासच असतो, कारण ते बरेचदा अहंकाराने कलंकित झालेले असते. परंतु, व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासारखी बनण्याकडे तिचा स्वाभाविक कल असतो त्यामुळे, भक्त जर का प्रामाणिक असेल तर, तो ज्याची पूजाअर्चना करतो त्या ‘ईश्वरा’सारखा तो बनू लागतो आणि अशा प्रकारे त्याचे प्रेम हे अधिकाधिक शुद्ध होत जाते. व्यक्तीचे ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती ‘ईश्वर’च आहे असे समजून त्याची भक्ती करावी, हा एक उपाय म्हणून बरेचदा सांगितला जातो, पण जोवर व्यक्तीचे हृदय आणि विचार हे विशुद्ध होत नाहीत तोवर ही गोष्ट त्याला खेदजनक अधोगतीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 297)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…