खरे प्रेम एकच असते आणि ते प्रेम म्हणजे ‘ईश्वरी प्रेम’; प्रेमाची इतर सर्व रूपं म्हणजे त्या ईश्वरी प्रेमाची विरूपे असतात, त्या प्रेमाची संकुचित, मर्यादित रूपं असतात. अगदी भक्ताचे देवावरील प्रेम हे सुद्धा एक प्रकारे प्रेमाचा ऱ्हासच असतो, कारण ते बरेचदा अहंकाराने कलंकित झालेले असते. परंतु, व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासारखी बनण्याकडे तिचा स्वाभाविक कल असतो त्यामुळे, भक्त जर का प्रामाणिक असेल तर, तो ज्याची पूजाअर्चना करतो त्या ‘ईश्वरा’सारखा तो बनू लागतो आणि अशा प्रकारे त्याचे प्रेम हे अधिकाधिक शुद्ध होत जाते. व्यक्तीचे ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती ‘ईश्वर’च आहे असे समजून त्याची भक्ती करावी, हा एक उपाय म्हणून बरेचदा सांगितला जातो, पण जोवर व्यक्तीचे हृदय आणि विचार हे विशुद्ध होत नाहीत तोवर ही गोष्ट त्याला खेदजनक अधोगतीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 297)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…