समर्पण – ५७
प्रश्न : आपले समर्पण हे समग्र आहे किंवा नाही हे व्यक्तीला कसे समजेल?
श्रीमाताजी : मला तरी यात काही अवघड आहे असे वाटत नाही. व्यक्तीने एक छोटासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. एखादा असे म्हणू शकेल की, “मी ‘ईश्वरा’ला समर्पित झालो आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने ठरवावी अशी माझी इच्छा आहे, बघू या.” तेव्हा हा तुमचा आरंभबिंदू असतो.
अजून एक छोटासा प्रयोग लक्षात घेऊ : समजा ईश्वर ठरविणार आहे की, अमुक अमुक गोष्ट घडणार आहे आणि नेमकी ती तुमच्या भावनांच्या विरोधात जाणारी असेल. तर अशा वेळी व्यक्ती स्वत:लाच म्हणते, “जर ईश्वराने मला, ‘तू अमुक अमुक गोष्ट सोडून द्यायची आहे’ असे सांगितले तर?…’’ – तुमची प्रतिक्रिया काय होते ते लगेच पाहा, तुम्हाला स्पष्टपणे कळून चुकेल; जर त्यामुळे आतमध्ये काहीतरी टोचणी लागली असेल तर तुम्ही स्वत:ला असे सांगू शकता, “समर्पण अजून परिपूर्ण झालेले नाही” – कारण आत कोठेतरी रुखरुख लागलेली आहे, आत काहीतरी ठुसठुसत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 345-346)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…