एकत्व ०१
आत्ताच्या घडीला करायलाच हवे असे सर्वांत उपयुक्त कार्य कोणते? ‘क्रमवार विकसित होणाऱ्या वैश्विक सुसंवादित्वाचे आगमन’ ही गोष्ट साध्य करणे, हे सर्वसाधारण ध्येय असले पाहिजे.
पृथ्वीच्या संदर्भात, हे साध्य प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे जे ‘एकम्’ आहे अशा आंतरिक दिव्यत्वाचे, सर्वांकडून आविष्करण आणि त्या ‘एकम्’ विषयीच्या जागृतीद्वारे, मानवी एकतेचे प्रत्यक्षीकरण हे होय.
आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वराचे साम्राज्य स्थापन करून, त्याद्वारे ऐक्य निर्माण करणे, हा ह्याचा अर्थ आहे.
त्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे पुढील कार्य करावयास हवे –
१) व्यक्तिगत कार्य : व्यक्तीने आपल्या अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाविषयी जागृत होणे आणि त्याच्याशी ऐक्य संपादन करणे.
२) मानवामधील आत्तापर्यंत जागृत नसलेल्या अस्तित्वातील अवस्थांचे व्यक्तिकरण (individualise) करणे आणि त्याद्वारे पृथ्वीपासून आजवर कुलूपबंद असलेल्या, एक किंवा अधिक वैश्विक शक्तींच्या उगमांशी, पृथ्वीचा संबंध जुळवून आणणे.
३) सद्यकालीन मानसिकतेशी मिळत्याजुळत्या अशा एका नवीनच रूपामध्ये शाश्वत वचन जगासमोर पुन्हा मांडणे. आजवरच्या सर्व मानवी ज्ञानाचा तो समन्वय असेल.
४) सामूहिक कार्य : एका शुभंकर अशा स्थानी, नव्याने फुलून येणाऱ्या नूतन वंशाची, ईश्वरपुत्रांच्या वंशाची एक आदर्श समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 49)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…