तुमची लौकिक जीवने, तुमच्या ऐहिक आवडीनिवडी यांचा मेळ घालणे, जीवनातील अडीअडचणी, यशापयश, ह्या साऱ्यांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी दोघांनी सहचर बनणे – हा विवाहसंस्थेचा खरा पाया आहे पण हे एवढेच पुरेसे नाही ह्याची तुम्हाला जाणीव आहेच.
दोघांच्या संवेदना एकसारख्या असणे, दोघांची सौंदर्यविषयक अभिरुची सारखीच असणे, त्याचा एकत्रित आस्वाद घेणे, दोघांना एकसमान गोष्टी भावणे, परस्परांनी परस्परांच्या माध्यमातून व परस्परांसाठी जीवन जगणे हे उत्तम आहे, ते आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.
गहनतर अशा भावनांमध्ये एकत्व असणे, जीवनाच्या सर्व आघांतामध्येदेखील परस्परांबद्दलची न डळमळणारी आपुलकी व तोच हळुवारपणा, संवेदनशीलता कायम राखणे, दुःखनिराशा, क्षोभ यांसारख्या क्षणीदेखील एकमेकांच्या सोबत असणे, कायमच आणि प्रत्येक प्रसंगांमध्ये आनंदी, अगदी आनंदी, एकत्र असणे; प्रत्येकच परिस्थितीत परस्परांविषयी समचित्त, शांत आणि आनंदी असणे – हे सारे चांगले आहे, चांगलेच आहे, आवश्यकही आहे परंतु ते पुरेसे नाही.
या सगळ्याच्या पलीकडे, जन्म, देश, भोवताल, शिक्षण या परिस्थितीपासून सर्वस्वी स्वतंत्र, त्यांच्या अतीत, एक चिरंतन प्रकाश, आपल्या अस्तित्वाचे परमोच्च सत्य, आपल्या अंतरंगांत खोलवर, केंद्रस्थानी, तसेच आपल्या अस्तित्वाच्या शिखरावर विराजमान असते. हे परमोच्च सत्यच आपल्या आध्यात्मिक विकासाचे उगमस्थान आहे, कारण आहे आणि स्वामी आहे. तेच आपल्या जीवनांना चिरस्थायी अशी दिशा देत असते; ह्याच सत्याकडून आपली नियती ठरवली जाते; ह्या सत्यचेतनेच्या ठायीच आपण एकत्व पावावयास हवे. अभीप्सा आणि आरोहण यांबाबतीतही परस्परांत एकत्व असणे, आध्यात्मिक मार्गावर दोघांनी समान गतीने वाटचाल करणे, हे चिरस्थायी अशा एकत्वाचे गुपीत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 236-37)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…